Secularism धर्मनिरपेक्षता
ही संकल्पना युरोपमध्ये उदयास आली.
चर्च आणि राजे यांच्यात मतभेद होते. चर्चच्या विचारानुसार चर्चचे शासन स्वर्गावर असेल व राजांचे पृथ्वीवर ( त्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर) असेल. परंतु पृथ्वी हे स्वर्गापेक्षा हीन असल्यामुळे चर्च राजांच्या शासनात हस्तक्षेप करू शकेल.
पहिल्यांदा ख्रिस्चानांची कॅथोलिक हीच शाखा होती. पुढे ख्रिश्चनांचे कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट असे दोन विभाग पडले. संपूर्ण युरोपमध्ये काही ठिकाणी कॅथोलिक बहुलभाग व अन्य ठिकाणी प्रोटेस्स्टंट बहुलभाग निर्माण झाले.
यात बहुल शाखेने अल्पसंख्यशाखेवर अन्याय करू नये व अल्पसंख्यांकांचे त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी सेक्युलररिझमची संकल्पना आणली.
येथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दोन्ही शाखा ख्रिश्चनंच्याच होत्या त्यामुळे सेक्युलरिझम ही संकल्पना त्यांचे दोन पंथ यामध्ये सामोपचार राहावा यासाठी उदयाला आली होती.
परंतु या संकल्पनेने युरोपातून बाहेर आल्यावर वेगळे रूप धारण केले. विशेषतः भारतात याचे अनेक दुष्परिणाम झाले.
प्रथमतः मुद्दा ही संकल्पना दोन भिन्न धर्मांच्या बाबतीत लागू केली गेली. दुसरी गोष्ट या संकल्पनेनुसार हिंदू धर्मियांना त्यांच्या धर्मावर, परंपरांवर अनेक बंधने घातली गेली.
या संकल्पनेची भारतासारख्या आधीच सहिष्णु देशाला गरज नव्हती.
या विदेशी संकल्पनेचा अनावश्यक वापर करून हिंदूंवर अत्याचार करण्यात आले.